Wednesday, August 7, 2019

Friendship day, सरस्वती आणि मी

मनात खोलवर असलेलं कागदावर उतरतं ते खरं लिखाण.. ते पोचतं समोरच्याच्या मनात.. रोज भेटणारी माणसं, भोवतालच्या घटना, वाचलेली पुस्तके एवढंच काय वेगळा आशय असणारे movies, ठेहराव असणारी गाणी हे सगळंच कुठेतरी समृद्ध करत जातात आपलं जगणं आणि आपलं लिखाणही.. 

मला शाळेच्या पेपर मध्ये निबंध लेखनात कधीच चांगले मार्क मिळाले नाहीत.. upsc चा अभ्यास करताना निबंध लेखन करताना तर खात्रीच पटली की आपला आणि लिखाणाचा दूरवर पण काही संबंध नाही.. पण दिलेल्या विषयावर लिहिण्यापेक्षा मनातून स्फुरणाऱ्या विषयावर लिहिलेलंच बहुतेक पोचत असावं कुठेतरी.. एकदा विचारांना स्थिरता आली कि शब्द कागदावर उतरायला वेळ नाही लागत.. अनुकूल परिस्थिती नाही लागत.. ट्रेन मध्ये चेंगरून उभे असतानाही लेख पूर्ण होऊ शकतो.. 

कॉलेज मध्ये कविता करणारे नवकवी rat-race मध्ये हरवून जातात.. पण हीच वेळ असते जेव्हा आपल्याला बाहेरचं जग कळतं.. आपले अनुभव समृद्ध होत जातात.. आणि याच सोबत आपल्यातला लेखक पण matured होतो हळूहळू.. आणि नेमकं याच वेळी आपण आपल्या या मित्राला विसरतो.. हा एक मित्र असा आहे जो भल्याबुऱ्या प्रसंगात आपल्या नेहमी सोबत असतो.. आपण साथ सोडली तरी तो उभा असतो काठावर ओथंबून आपली वाट बघत.. 

सरस्वती आणि शारदा यांची मानसपूजा करून (आता या दोघींमध्ये नेमका फरक काय आणि साम्य काय हे  परत कधीतरी..) मी आज friendship day च्या निमित्ताने या माझ्या जुन्या मित्राला परत साद घालत आहे.. माझ्यातल्या लेखकाला मला परत एकदा भेटायचे आहे.. बाकी विषय पुरवायला मुंबई समर्थ आहेच.. त्यामुळे आजपासून आता रोज.. माझा हा मित्र मला भेटेल अशी स्वतःकडूनच अपेक्षा.. पूर्वी डायरी - पेन होते त्याची जागा आता ब्लॉग्स नी घेतली आहे एवढाच काय तो फरक.. तुमच्या अभिप्रायांनी ही मैत्री अधिक दृढ होवो हीच इच्छा.. 

भेटत राहू मंथन या facebook page वरून किंवा माझ्या blogger च्या official website वरून!!!



Pls, कविता कोणावर केली आहे विचारू नको
कदाचित ती जवळपासच कोणावरतरी असेल,
कदाचित ती तुज्यामुळेही सुचली असेल॥
एकदा कडेला नजर फिरवून तर बघ,
एकदा वळुन आरशात स्वतःचा चेहरा तर बघ॥
कळलं तुला तर चांगलच आहे
पण नाहीच कळलं काही तर
तर वाच अणि सोडून दे॥ पण ...
कोणावर लिहिली आहे विचारू नको ॥

Pls, तू असा कसा विचार करू शकते विचारू नको
कदाचित जे घडतं रोज तेच लिहिलं असेल,
कदाचित तुज्याही आयुष्यात तेच घडत असेल॥
एकदा लोकांची दुक्ख ऐकून तर बघ,
एकदा स्वतःच्याच आयुष्यात त्रयस्थपणे डोकावून तर बघ॥
कळलं तुला तर चांगलच आहे
पण नाहीच कळलं काही तर
तर वाच अणि सोडून दे॥ पण ...
कोणावर लिहिली आहे विचारू नको ॥

Pls, तू नुसतीच स्वप्नात जगतेस का विचारू नको
कदाचित भविष्याची हीच सुरवात असेल ,
त्याच स्वप्नांना पूर्ण करणारा उद्याचा दिवस असेल॥
एकदा तुही स्वप्नात जगुन तर बघ,
एकदा त्यांना खर करण्याचा प्रयत्न तर करून बघ
कळलं तुला तर चांगलच आहे ....


Pls, तुला असं कसा सुचतं विचारू नको
कदाचित तेव्हा फुलांचा गंध दरवळत असेल,
कदाचित तेव्हा कोणी रागदारी गात असेल,
कदाचित तेव्हा कोणाचीतरी आठवण येत असेल॥
एकदा समुद्र किनारी जाऊन तर बघ,
एकदा चंद्र उगवताना रंगलेले आभाळ तर बघ,
अणि कोणालातरी त्यावेळी मनापासून 'miss' तर करून बघ॥
एखादा श्वास फक्त त्या 'miss' साठी घेउन तर बघ
एकदा तेव्हा तूही काहीतरी लिहून तर बघ॥


-- अवनी गोखले-टेकाळे 

2 comments:

  1. Welcome back... सुंदरच लिहितेस की... थांबू नको आता...शारदा आणि स्वरस्वती दोघींचा वरदहस्त लाभला आहे तुला..
    Keep posting..

    ReplyDelete