आजोबांची पहिली बायको आणि मुलगी डाव अर्ध्यात सोडून गेलेले.. त्यानंतर आजी आली घरात माप ओलांडून.. वटपौर्णिमेला आजीने सांगितले कि मी वड पुजणार नाही.. ५५ वर्षांपूर्वी तो चर्चेचा विषय झाला होता.. पण आजी नी सगळ्यांना समजून सांगितले..
"त्यांच्या आधीच्या बायकोनी पण काही वर्ष वड पुजलाच होता ना.. दोघींनी वड पुजून देवाला कशाला कोड्यात पाडायचं.. पुढच्या जन्मी तिला राहिलेला संसार पूर्ण करता यावा.. "
आजोबा निःशब्द.. आजीनी दर वर्षी वटपौर्णिमेला हाच भाव जपला मनात.. संसारामधली सगळी कर्तव्य पार पाडूनही एक दान आजीने राखून ठेवले "तिच्यासाठी"..
माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही.. तरीही वाटते.. त्यांना पुनर्जन्म मिळावा आणि त्यांची साता जन्माची कहाणी सुफळ संपूर्ण व्हावी..
No comments:
Post a Comment